आश्चर्य ! ४७ डिग्री तापमानावर आज्जीनी शिजवली खिचडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी  |आशिष गवई

भारतीय हवामान विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भात काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे.अमरावतीचा पारा ४७ डिग्रीवर पारा पोहचला आहे .

वाढत्या तापमानामुळे मानवी जीवन चक्र बदलेले आहे, सकाळी काम आटोपून आपल्या घरातच राहणे पसंत करीत असल्याने रस्ते निर्मनुश्य झाले आहे. ग्रामीण भागातीलही मजूर शेतकरी सकाळी शेतात जाऊन दुपारी बारा वाजता आपल्या घराकडे परतत आहे.

अमरावतीतील धामणगाव रेल्वे येथे एका महिलेने आपल्या घराच्या टिनपत्र्यावर तांदूळ व डाळ सकाळी नऊ वाजता अशी खिचडी ठेवली असता ती दोन वाजेपर्यंत शिजली असल्याचे महिलेने सांगितले.

Leave a Comment