आज वसूली चालू है या बंद? अमृता फडणवीसांचा खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे.

अमृता फडणवीस ट्विट करत म्हणाल्या, ‘कोणी मला सांगेल का?, आज वसूली चालू है या बंद?’ असा  खोचक सवाल करत त्यांनी महाराष्ट्र बंदला आपला विरोध दर्शवला आहे. तसेच महाराष्ट्र बंद नही है असा हॅशटॅग त्यांनी वापरला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. आजच्या महाराष्ट्र बंद मुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड झाला आहे असे ते म्हणाले. लखीमपूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात बंद केला जातो. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मात्र हे सरकार एकही पैसा द्यायला तयार नाही. आज राज्यातील शेतकरी संकटात आहे पण सरकारने मदत केली नाही असा आरोप त्यांनी केला.

Leave a Comment