खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून फायबर बोटीची व्यवस्था

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खिरखिंडी (ता. जावली) येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास (ता. जावली) येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्यावतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकरी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट दिली.

जावली तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मौजे खिरखिंडी हे गाव वसलेले आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 7 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या 25 आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मौजे अंधारी (ता. जावली) येथील हायस्कूलमध्ये जावे लागते. सह्याद्री वाघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असलेल्या खिरखिंडी, आडोशी, माडोशी, रवंदी व कुसापूर या गावातील 70 कुटुंबाचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एकसाल सागाव या ठिकाणी वन्य विभागाने केले असून त्यासाठी 242 हेक्टर जमिन संपादित केली आहे. 70 कुटुंबापैकी 6 कुटुंबांनी जमिन ताब्यात घेतली नाही. ते एकसाल सागाव या गावी जावून जमिन ताब्यात न घेता परत आले आहेत. तसेच 1 कुटुंब यांनी जमिन ताब्यात घेतली असून ते परत खिरखिंडी येथे वास्तव्यास आले आहे. अशी एकूण 7 कुटुंबातील 25 लोक खिरखिंडी येथे राहतात.

त्याच कुटुंबातील एकूण 8 मुले (4 मुले व 4 मुली) अंधारी येथील हायस्कूलला शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. त्यासाठी मौजे खिरखिंडी गावातील 4 मुले व 4 मुली यांना घरापासून ते कोयना जलाशय किनारा पर्यंत येण्यासाठी 10 मिनिटे लागतात. तेथून पुढे कोयना जलाशय ते शेंबडी मठ जलाशयातील 600 मिटर प्रवास बोटीने करावा लागतो. तेथून पुढे अंधारी येथील हायस्कूलला फळणी मार्गे पायी जाण्यासाठी साधारणत: एक तास इतका वेळ लागतो. मौजे अंधारी ता. जावली येथील हायस्कूल हे अनिवासी हायस्कूल आहे. तथापी मौजे अंधारी येथे कसाईदेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अंधारी-कास ही निवासी आश्रमशाळा असून तेथे या विद्यार्थ्यांची निवासाची सोय होऊ शकते. तरीही हे विद्यार्थी निवासी राहत नाहीत. ते घरुनच येऊन-जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने त्यांना लाईफ जॅकेट पुरविण्यात आलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी फायबर बोटीची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

नगरसेवक सुहास राजेशिर्के धावले मदतीला

सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडच्या दुर्गम भागात असणाऱ्या कोयना जलाशयातून खीरखंडी गावातील मुलींचा शिक्षणासाठी होडीतून जीवघेणा प्रवास सुरु असून या मुलींचे मागील पाच वर्षापासून हा खडतर प्रवास सुरू आहे. यासाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी लाइफ जॅकेट देऊन मुलींचा प्रवास सुखकर केला आहे. अंधारी येथील शिक्षकांनी आभार मानले असून मुलांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या मुलींना रोज सकाळी लवकर खीरखंडी गावातून कोयना जलाशयात होडी चालवून पाच किलोमीटरचा प्रवास पायी जंगलातून करावा लागत आहे.

Leave a Comment