३० मे पर्यंत औरंगाबाद मधून कोरोनाला हद्दपार करु – महापालिका आयुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील नागरिकांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही 30 मे पर्यंत कोरोनाला शहरातून हद्दपार करू असा विश्वास महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबादेतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त की.

शहरात फक्त 36 मूळ कोरोना संक्रमित रुग्ण असून शहराचे नागरिक त्यांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्णांची संख्या तीनशेच्या उंबरठ्यावर असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. पुढील काही दिवसात ही संख्या अशीच वाढेल व त्यानंतर कमी होईल असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी घरीच राहावे आणि प्रशासनाला मदत करावी असे आवाहन पांडेय यांनी केले आहे.

Leave a Comment