कोणत्याही समस्येवर रामबाण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ; बाळासाहेब थोरातांनी केले तोंड भरून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय हवा असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवाय पर्याय नाही अस म्हणत बाळासाहेब थोरात यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले आहे. पृथ्वीराज चव्हाण कधीही खोट बोलत नाहीत जे खर आहे तेच ते बोलणार आणि ते खोट आश्वासन कधीही देत नाही, बनवाबनवीचा कार्यक्रम नाही अस बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल. कराड येथे काँग्रेसच्या मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.

पृथ्वीराज बाबा विद्वान आहेत. देशपातळीवर अतिशय महत्त्वाचे काम करत असताना त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले.पण तरीही त्याची कारकीर्द ही यशस्वी कारकीर्द असा उल्लेख मी करेन कारण त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द मी फार जवळून पहिली अस बाळासाहेब थोरात म्हणाले.

काळाच्या ओघात काही लाटा आल्या.काही लाटा देशाने पहिल्या, काँग्रेसने पहिल्या पण येणारा काळ हा निश्चितपणे आपल्यासाठी चांगला असणार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. तसेच देशात काँग्रेसची बाजू मांडायची असेल तर पृथ्वीराज बाबा महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत.असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Prithviraj Chavan आणि Vilaskaka Undalkar यांचं मनोमिलन ; कराड मध्ये काॅंग्रेस पुन्हा एकदा मजबुतीकडे

आज अत्यंत चांगली गोष्ट घडली की आपण सगळे एकत्र मिळून एक ताकद उभी करतोय. 5-6 वर्षांपूर्वी जगात अशी परिस्थिती आली होती की माणसांमाणसा मध्ये भेद निर्माण करायचा , त्याच्या मताची पोळी भाजायची आणि त्यातून सत्ता मिळवायची. यापूर्वी तुर्कस्तान आणि अमेरिकेत अस झालं आणि भारतातही काही वेगळं नाही. धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये भेद निर्माण केला जातोय आणि राजकीय पोळी भाजली जातेय असा आरोप त्यांनी भाजपवर केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment