कॉलेजमधून घरी येताच बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ पाऊल, काय घडले नेमकं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये नुकतीच सुरु करण्यात आले. याचदरम्यान भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या विद्यार्थ्याने कॉलेजमधून घरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत विद्यार्थी हा भंडाऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका गरीब परिवारातील हुशार विद्यार्थी असलेला हा तरुण घटनेच्या दिवशी सकाळी कॉलेजला गेला होता. कॉलेज संपल्यानंतर तो घरी आला त्यावेळी घरी कोणीच नव्हते. त्याची आई शेतीकामासाठी बाहेर गेली होती तर वडील जनावरे चारण्यासाठी गेले होते.

यावेळी त्याने घरी कोणीच नसल्याचे पाहून त्याने आपल्या घरातील स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. हा तरुण आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून तो अभ्यासात अतिशय हुशार होता. मात्र त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment