लहरी राजाचा लहरी कारभार, बार उघडे मंदीर बंद; भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निधन साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणते निर्बंध कसे उठवायचे याचा काही अभ्यास नाही. लहरी राजाचा लहरी कारभार, बार उघडे मंदीर बंद ठेले आहेत,” अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधांबद्दल सांगितल्यानंतर काल सायंकाळी राज्यसरकारच्यावतीने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे. तर जिथे कोरोना रुग्णसंख्या कायम आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. परंतु राज्यातील मंदिरे उघडण्यास मात्र सरकारने अद्याप हिरवा झेंडा दाखवलेला नाही. यावरून टीका करताना भाजपचे नेते अतुल भातखळकर म्हणाले की, या अजब ठाकरे सरकारचा गजब कारभार अजून सुरूच आहे. लोकल ट्रेनबाबत अजून निर्णय होत नाही, आता मात्र भाजप याविरोधात आंदोलन करणार आहे.

ठाकरे सरकारचं निर्बंधांबद्दलच काल जाहीर केलेलं धोरण नेमकं कोणत्या आधारावर आहे तेच कळत नाही. हे ठाकरे सरकार धोरण नसलेलं सरकार आहे. राज्यात रात्री 10 वाजेपर्यंत हॅाटेल उघदे ठेवायला परवानगी दिली जात आहे. मग मंदिर उघडायला या सरकारला काय अडचण वाटते, असा सवालही यावेळी भातखळकर यांनी केला आहे.

Leave a Comment