रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे काम करीत आहेत. GRP म्हणजे सरकारी रेल्वे पोलिस हे राज्याचे पोलिस असतात मात्र ते रेल्वे स्थानकांवर तैनात असतात.

देशभरात रेल्वे 230 गाड्या चालवीत आहे
रेल्वे सध्या देशभरात 230 गाड्या चालवीत आहे आणि 12 सप्टेंबरपासून आणखी 80 स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांसह रेल्वे कर्मचार्‍यांनाही वारंवार कोविड -१९ बाबत खबरदारी घेण्यास सांगितले जात आहे. मात्र कोरोनाच्या उद्रेकानंतरही मोठ्या संख्येने लोकं निष्काळजीपणा दाखवीत आहेत. अशा लोकांसाठी हे कठोर धोरण सुरू केले गेले आहे.

मास्क न घालण्याबद्दल लोकं बरेच निमित्त करतात पण अशा दुर्लक्षासाठी कोणालाही सोडले जाणार नाही. तर आपणसुद्धा रेल्वेने प्रवासाची योजना आखत असाल तर कोरोनासंदर्भात बनविलेले प्रत्येक नियम तुम्हाला पाळावे लागतील हे लक्षात ठेवा.

या मार्गांवर 80 स्पेशल गाड्या धावतील
भारतीय रेल्वे 12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल गाड्या सुरू करणार आहे. 10 सप्टेंबरपासून प्रवाशांना या नवीन गाड्यांसाठी आरक्षण मिळू शकेल. कोटा ते देहरादूनला जाणारी नंदा देवी एक्स्प्रेस दररोज धावेल. राजस्थानमधील जबलपूर ते अजमेर जाण्यासाठी दयोदय एक्सप्रेस ट्रेन दररोज चालविली जाईल. प्रयागराज ते जयपूर या मार्गावर 02403 एक्सप्रेस ट्रेन धावेल. एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 01841 खजुराहो ते कुरुक्षेत्र मार्गावर चालविली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment