Birth Certificate | तुमचाही जन्म 2000 पूर्वी झाला असेल, तर ‘या’ तारखेपर्यंत काढा जन्म प्रमाणपत्र; सरकारने केली अधिसूचना जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जन्माचा दाखला हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा कागदपत्र आहे. जन्मानंतर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे कागदपत्र हा आपला जन्म दाखला असतो. अनेक सरकारी काम किंवा इतर कामांमध्ये देखील जन्माचा दाखला खूप आवश्यक मानला जातो. त्यामुळे लहान मुलाचा जन्मानंतर लवकरात लवकर हा दाखला बनवून घ्यावा. नाहीतर जन्म प्रमाणपत्र नाही, या कारणाने अनेक समस्या उद्भवू शकतात. जन्माचा दाखला मिळवण्यासाठी पालकांना अनेक आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. त्यानंतरच आता जन्माचा दाखला मिळतो. परंतु तमिळनाडू सरकारने जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे.

तमिळनाडूमधील टेंकासी जानेवारी 2019 जन्मलेल्या लोकांसाठी जन्म प्रमाणपत्र बनवण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे. आता 2000 पूर्वी जन्मलेल्या लोकांच्या जन्म प्रमाणपत्र हे डिसेंबर 2024 पर्यंत बनवता येणार आहे. त्यानंतर बनवता येणार नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी कमल किशोर यांनी दिलेली आहे. जन्म नोंदणी कोणत्याही व्यक्तीसाठी ओळखपत्र म्हणून काम करते. जनगणनेत देखील याची खूप गरज असते.

जन्म प्रमाणपत्र डिसेंबर 2024 पर्यंत बनवता येईल | Birth Certificate

टेंकासीचे जिल्हा अधिकारी कमल किशोर यांनी सांगितले की, जिल्ह्यात 1 जानेवारी 2000 पूर्वी जन्मलेल्या आणि 15 जानेवारी 2000 नंतर जन्मलेल्या मुलांसाठी जन्म प्रमाणपत्र मिळविण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही तुमचे जन्म प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2024 पर्यंत मिळवू शकता. नियमांनुसार, मुलाच्या जन्मानंतर 21 दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. जर एखाद्या मुलाच्या जन्माची नोंदणी नावाशिवाय झाली असेल, तर पालक मुलाच्या जन्माच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत लेखी प्रतिज्ञापत्र देऊन मुलाची नोंदणी करून घेऊ शकतात. यासाठी पैसे देण्याची गरज नाही.

जन्मानंतर 15 वर्षांनी नोंदणी करता येत नाही | Birth Certificate

12 महिन्यांनंतर 200 रुपये विलंब शुल्क भरून 15 वर्षांच्या आत नाव नोंदणी करता येते. मात्र, 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे नाव नोंदवता येणार नाही. ज्यांनी अजूनही आपल्या मुलांचे जन्म दाखले घेतलेले नाहीत. ते या संधीचा लाभ घेऊ शकतात, असे जिल्हा अधिकारी कमल किशोर यांनी सांगितले.