अंगार विसरलेले मुख्यमंत्री भंगाराचे कौतुक करतायत; भातखळकरांची जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपला घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकामागून एक गंभीर आरोप करत भाजपला धारेवर धरले आहे. मलिकांच्या या लढ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसहित नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत असा टोला त्यांनी लगावला.

याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल, गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भांगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत’, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचे कौतुक-

नवाब मलिक यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना व्हिडिओ क्लिप, कागदपत्रे सादर केली, त्याचा उल्लेख करीत मलिक यांचं कौतुक केलं. तसंच, ‘मलिक यांनी जी भूमिका घेतली आहे, ती अशीच पुढे सुरू ठेवावी,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करताच सर्व मंत्र्यांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला.

Leave a Comment