सरकारने जनतेच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करावे – भाजपची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. दरम्यान यानंतर सरकारने जनतेला थेट 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखलकर यांनी केली आहे.

भातखलकर म्हणाले, सरकारने घेतलेल्या लॉकडाऊच्या निर्णयानंतर भाजप जनतेच्या पाठीशी उभे आहे. राज्य सरकारच्या उपाययोजनाना देखील आम्ही पाठिंबा देतोय पण मुख्यमंत्र्यांनी जनतेवर कोरोनाचे खापर फोडु नये, अपयशाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि लॉकडाउनचा निर्णय घेत असताना सर्वसामान्य लोकांना थेट आर्थिक मदत केली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करावे असे अतुल भातखलकर यांनी म्हंटल.

स्वतःच्या नेत्यांना राजकारण करण्यापासून थांबवा. आणि विनाकारण केंद्रावर आणि राज्यातील विरोधी पक्षांवर टीका करणे थांबवा. तुमच्या नाकर्तेपणामुळे हा कठीण समय आला असला तरी भाजप जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी उभा आहे असेही ते म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment