उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही; चंद्रकांतदादांकडे कॅबिनेट मंत्र्याचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे,’ असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नेमक्या कोणत्या नेत्याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे, याबाबत नेमका अंदाज बांधणं कठीण आहे.

दरम्यान, राज्यात बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कायद्याचा धाक नाही म्हणून अशा घटना होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत परिस्थिती हाताळली पाहिजे, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment