मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनी अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असो वा सुल्तानी, मोदी सरकार कायम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलं आहे. आमचं सरकार असतानाही आम्ही कायम शेतकरी हिताची भूमिका घेतली. मात्र ठाकरे सरकारला शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोठ्या उत्साहात त्यांना मदतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात सरकारने मदत दिली नाही. कुठं गेला सरकारचा वादा?”, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

राजा उदार उधार झाला आणि हाती भोपळा आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, तेव्हा 25 हजारी हेक्टरी द्या असे म्हटले होते मात्र देण्याची वेळ आली तेव्हा 8 हजार दिले, ही दुट्टपीपणाची भूमिका आहे”, असं फडणवीस म्हणाले. ‘राजा उदार उधार झाला आणि हाती भोपळा आला’, अशी या सरकारची अवस्था असल्याची टीका फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment