धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला धडा शिकवा – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजपबद्दल समाजबांधवांच्या मनात द्वेेष निर्माण झाला पाहिजे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री हे खोटारडे आहेत. ते समाजाला आरक्षण देणार नाहीत. समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला समाजबांधवांनी मतदान करू नये, देशाच्या एकात्मतेसाठी कॉंग्रेसला मतदान करावे, असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ धनगर मेळाव्याचे आयोजन वारणा मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला रामहरी रूपनवर, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

सिध्दरामय्या यांनी यावेळी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या खोटारडेपणावर जोरदार हल्लाबोल केला. ‘सबका साथ सबका विकास’ हे फसवे असून भाजप व त्यांचा एकही नेता तसं वागत नाही. मोदी व फडणवीस केवळ पोकळ बाता मारतात. खोटं बोलून सत्ता मिळविणे हा भाजपचा डाव आहे. कॉंग्रेस -राष्ट्रवादी हे पक्ष सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे आहेत. भाजपने मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांचा कधीही विचार केला नाही. भाजपने आजपर्यंत कधीही घटनेचा गौरव केलेला नाही. अनंतकुमार हेगडे सारखे भाजपचे अनेक नेते आम्ही घटना बदलण्यासाठी निवडून आलो आहे असे उघडपणे सांगतात.

शेतकरी, महिला, दलित, युवक, अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले आहेत नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे नालायक आहेत. नोटबंदी, जीएसटी यामुळे रोजगार, व्यवसाय उद्योग अडचणतीच आणले. राज्यात महापूर आला. त्यावेळी मोदी महाराष्ट्रातील जनतेला आधार देण्यास, त्यांची भेट घेण्यास वेळ मिळाला नाही. तरूणांनी मोदी मोदी करीत त्यांच्या मागे लागून आपले आयुष्य उदध्वस्त करून घेऊ नका. सर्वांना सोबत घेऊन जाणारी कॉंगेस बळकट करा, सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना विजयी करा असे आवाहन केले.

Leave a Comment