ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न; अतुल भातखळकरांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत क्रुझवरील पार्टीवर एनसीबीने धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले. यावरून भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न आहे, असा आरोप भातखळकरांनी केला आहे.

भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी म्हणाले की, मागील वर्षभराच्या काळात एनसीबीने राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. हि कारवाई केल्यानंतर क तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती.

नुकतेच एनसीबीने क्रुझवर छापा टाकला. या छाप्यात आर्यन खानसह अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून मोठ्या अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबई सारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग तसेच ठाकरे सरकार केवळ बघ्याची भूमिका पार पाडत असल्याची टीकाही यावेळी भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी केली आहे.

Leave a Comment