शाळा सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव; फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शाळा सुरु करण्या संदर्भातील शिक्षण विभागाच्या निर्णयाला टास्क फोर्सने स्थगिती दिली असल्याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आली. यावरून आज भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “या सरकारमध्ये शाळा सुरु करण्याबाबत समन्वयाचा अभाव आहे. मंत्री, टास्क फोर्स आणि सरकार वेगळ्या घोषणा करतात. याचा पालकांना त्रास होतोय, अशी टीका फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे जिल्ह्यातील कोपरी पुलास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच्या स्थगितीवरून ठाकरे सरकारवर टीका केली. टीका करताना फडणवीस म्हणाले की, राज्यात सध्या टास्क फोर्स, राज्यातील मंत्री, राज्य सरकार यांच्यामध्ये कोणताही ताळमेळ नाही. अशा प्रकारच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश जातो. सरकारला वाटत असेल शाळा सुरु नाही करायच्या तर नाही केल्या पाहिजे. मात्र, एकत्रितपणे अशा प्रकारचे निर्णय झाले पाहिजे. चुकीच्या निर्णयामुळे पालकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण होते.

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला होता. मात्र, सरसकट शाळा सुरू न करण्याचा विचारही करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व टास्क फोर्सच्या बैठकीतील चर्चेत असे केल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येईल, असे सांगत टास्क फोर्सने या निर्णयाला स्थगिती देण्याचा सूचना केली होती. त्यानंतर राज्य सरकारने आज शाळा सुरु करण्याचा जीआरला स्थगिती दिली.

Leave a Comment