एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात तरी उतरले का? दरेकरांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राटील पूरस्थिती वरून विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत रिकामटेकडे दौरे करतायत की टीका करतात हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटल.

प्रवीण दरेकर म्हणाले, एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?, कुठे पाहणी करायला गेले का?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगावं. आणि सर्वसामान्य जनतेचा कानोसा राऊतांनी घ्यावा,’ असा सल्ला दरेकरांनी दिला.

केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांची अश्रू पुसणं वेगळं आहे, तसेच, तौक्ते वादळातही आम्ही साईटवर होतो. आताही होतो. त्यामुळे रिकामटेकडे दौरा करतात की फक्त टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे, असं दरेकर म्हणाले.

Leave a Comment