सरकारशी कृषी कायद्यांवर चर्चेसाठी आम्ही पुन्हा एकदा तयार; टीकेत यांच्या प्रस्तावानंतर ट्विस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टीकेत यांचा अश्रू अनावर झालेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर उत्तर प्रदेश आणि हरयाणातील अनेक गावखेड्यांत भावूक लहर उठून शेतकरी दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकरी जमू लागले आहेत. यानंतर राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारला चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. गाझीपूर बॉर्डरवर सकाळपासून शेतकऱ्यांची वर्दळ वाढत आहे.

भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत बॉर्डरवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कृषी कायद्यांसंदर्भात आम्ही पुन्हा एकदा सरकारशी चर्चा करू. जो आमचा मार्ग आहेत, त्याच्यावर चर्चा करू. यासंदर्भात आम्ही सरकारला निरोप पाठविला आहे, की आमची भारत सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा आहे.

सरकारने १८ महिने कायदा स्थगित करण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करणार का? यावर टिकैत यांनी नाही असं उत्तर दिलं. तसेच पुन्हा सरकारशी चर्चा करू. टिकैत यांनी दिलेल्या या वक्तव्यानंतर, आता सरकारकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचारनंतर आंदोलनात अनेक चढ-उतार बघायला मिळाले आहेत. खरे तर यापूर्वी सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात कृषी कायद्यांवर तब्बल ११ वेळा चर्चा झाली आहे. मात्र, या सर्वच चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. अशात टिकैत यांनी सरकारकडे चर्चेची इच्छा व्यक्त केल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’. 

Leave a Comment