भाजपचा पराभव कंगणाच्या जिव्हारी; पश्चिम बंगालची तुलना केली काश्मीरशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून एकहाती सत्ता काबीज केली आहे. परंतु ममता बॅनर्जी यांचा हा विजय अभिनेत्री कंगना राणावतला चांगलाच खटकला आहे. कंगणाने ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे. यावेळी तिने बंगालची तुलना काश्मीरशी केली.

बांग्लादेशी आणि रोहिंगे हे ममता यांची मोठी ताकद आहे. ज्या प्रकारची प्रवृत्ती समोर येत आहे त्यातून असे दिसून येत आहे की, तिथे हिंदूंची संख्या फार कमी आहे. आकड्यांनुसार बंगाली मुसलमान संपूर्ण भारतात सर्वात गरीब आणि वंचित आहेत, चांगले आहे आणखी एक काश्मीर तयार होत आहे’, असे म्हणून कंगनाने थेट काश्मीरशी तुलना केली आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1388758033493204995?s=20

पुढे कंगनाने असे म्हटले आहे की, ‘२०१६ मध्ये भाजपने बंगालमध्ये ३ जागा जिंकल्या होत्या. आता NRC आणि CAA ची गरज आहे. बंगालमध्ये अंल्पसंख्यांक आता बहुसंख्यांक झाले आहेत. ज्या प्रकारे मोदी आणि अमित शहा यांनी उत्कटतेने आणि समर्पण पद्धतीने काम केले आहे त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1388781068786933761?s=20

दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने खूप जोर लावला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचाराला उतरले होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी जोरदारपणे या सर्वांचा सामना करत भाजपला अस्मान दाखवले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment