श्रीदेवींचा मृत्यू अपघाती नव्हे ती हत्या होती ; आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

केरळ |आपल्या कामामुळे आणि कडक शिस्तीने प्रसिद्ध असणाऱ्या ऋषिराज सिंह या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवीचा मृत्यू अपघाती नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने बॉलिवूड जगतात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवी यांच्या मृत्यूवर भाष्य केला आहे.

डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन आहेत. ते ऋषिराज सिंह यांचे मित्र आहेत. त्यांनी अनेक गूढ हत्यांचा तपास केला आहे. अशा प्रकरणाला उजेडात आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ऋषिराज सिंह यांनी उमादथन भारत यांना या प्रकरणातील बारकावे तपासण्यात यावे अशी विनंती केली. त्यावर उमादथन भारत त्यांनी आपले तर्क आणि पुरावे मांडले आहेत.

दुबईमध्ये श्रीदेवी यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी अतिप्रमाणात दारू पिली होती. बाथरूममध्ये असणाऱ्या टबमध्ये पडल्याने पाण्यात बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. मात्र टबमध्ये पडल्याने कोणाचा मृत्यू होऊ शकत नाही असे मत ऋषिराज सिंह यांनी फॉरेन्सिक तज्ञांच्या हवाल्याने व्यक्त केले आहे. श्रीदेवी यांना दारू पाजून त्यांना बाथरूममधील टबमध्ये पाण्यात बुडवून मारल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी केला आहे.

Leave a Comment