भगवा झेंडा खाली ठेवला नाही, आमचं अंतरंगही भगवंच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं भाजपाला प्रतिउत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जेष्ठ शिवसैनीकांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं.

”आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचं अंतरंग भगवंच आहे” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ”मी डरणारा नाही तर मी लढणारा आहे हे लक्षात असू देत. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न केला. तसेच दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागला. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती.असं उद्धव यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली. मात्र मला आज भाजपाला विचारायचं आहे की तुमचं काय काय उघड झालं? युती तर तुम्ही २०१४ ला तोडली होती आणि आज आम्हाला नावं ठेवत आहात का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपाला यावेळी केला.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की कशाचा समावेश होतो?

महाअधिवेशनात राज ठाकरेंचा फुसका बार; माध्यमांतील फुटेज खात, जुन्याच गोष्टी सांगत केली ‘महानिराशा’

मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे

 

 

Leave a Comment