शिवसेनेनं फडणवीसांना खडसावलं;कोणताही आरोप केला तरी सरकार पडणार नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। गेले काही दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्यांना ट्विटरवरून तर कधी प्रसार माध्यमातून लक्ष करताना दिसत आहे. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर कधी महाविकाघडीतील जयंत पाटील यांच्यावर फडणवीस यांनी ट्विटरवर टीका केली होती. या संपूर्ण प्रकारावर आता शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

फडणवीस रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात. फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर गेले काही दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्यांना ट्विटरवरून तर कधी प्रसार माध्यमातून लक्ष करताना दिसत आहे. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर कधी महाविकाघडीतील जयंत पाटील यांच्यावर फडणवीस यांनी ट्विटरवर टीका केली होती. या संपूर्ण प्रकारावर आता शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. हवे अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीस यांना खडसावलं आहे. फडणवीस यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, कोणतेही भन्नाट आरोप करून ‘ठाकरे सरकार’ पडणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे शिवसेनेनं म्हणते कि, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. विरोधी पक्षाचं इतकं अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगलं नाही, असं म्हणत शिवसेनेनं फडणवीसांवर निशाणा साधला.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा
Hello News

Leave a Comment