Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या कोणत्या क्षेत्राला काय मिळाले

0
29
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी आणि तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.. तसेच निर्मला सीतारामन म्हणाल्या की,”सर्वांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पात केलेल्या मोठ्या घोषणांबद्दल थोडक्यात जाणून घ्या …

1. तरुणांना 60 लाख नोकऱ्या दिल्या जातील.

2. पुढील 3 वर्षांत 400 नवीन पिढीच्या वंदे भारत गाड्या चालवल्या जातील.

3. 3 वर्षात 100 PM गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील.

4. 1.5 लाख पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग अंतर्गत येतील. पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर शक्य होणार आहे.

5. 2022-23 मध्ये 80 लाख नवीन घरे बांधली जातील.

6. देशात डिजिटल यूनिव्हर्सिटी तयार केले जाईल.

7. 20,000 कोटी रुपये खर्चून 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील.

8. देशातील 5 मोठ्या नद्यांना जोडण्यासाठी जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीनेही काम केले जाईल.

9. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे.

10. 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट लागू केला जाईल.

11. शहरांच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल.

12.वन नेशन, वन रजिस्‍ट्रेशन योजना सुरू केली जाईल. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल.

13. इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here