‘या’ महिन्यात लागणार CBSE दहावी, बारावीचे निकाल; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या दहावी, बारावीच्या निकालाची लाखो विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा आहे. मात्र सीबीएसई दहावी, बारावीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा अद्याप व्हायच्या आहेत. पण लॉकडाऊनमुळे आधीच उशिराने होत असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाला लागतील तरी कधी याबाबत विद्यार्थी-पालक प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक (HRD Minister Ramesh Pokhriyal  Nishank) यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. ‘CBSE बोर्डाच्या निकालांची घोषणा १५ ऑगस्टपर्यंत केली जाऊ शकते. बोर्ड काही दिवसांच्या अंतराने दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करेल ‘ अशी माहिती रमेश पोखरियाल यांनी दिली.

पोखरियाल म्हणाले की १५ ऑगस्ट २०२० पर्यंत CBSE दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. हे निकाल फेब्रुवारी-मार्च २०२० आणि जुलै २०२० या दोन्ही टप्प्यांत झालेल्या परीक्षा मिळून तयार केला जाईल. तोपर्यन्त CBSE शाळा आणि संबंधित विभाग १ जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेल्या CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ जुलै पासून होणार आहेत. १५ जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण करण्यात येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment