राज्यसभेपेक्षा आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा भूकंप होणार; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या खेळीमुळे महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला. या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जसा देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून भूकंप झाला. त्याहून मोठा भूकंप आता होणार असल्याचे पाटील यांनी म्हंटले.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत विजय हा आमचाच होणार असून मी त्यासाठी गुलालही शिल्लक ठेवला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधान परिषद निवडणुकीसाठीची पूर्वयोजना तयार केली आहे. आम्हाला विश्वास आहे कि आम्ही पाचवी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. केवळ आता गुलाल बाकी राहिला आहे. तोही आम्ही शिल्लक ठेवला आहे.

आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकारण करत नाही. आणि पक्षाशी गद्दारी हि आमच्या पक्षात कधीच चालत नाही. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आज भाजपची विधानपरिषदेची जागा हि नक्कीच निवडून येणार असल्याचे म्हंटले आहे.

Leave a Comment