चंद्रकांत पाटील यांच्याकडून नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन, म्हणाले बोलण्याची ती एक स्टाईलच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅलनाईन | राजकीय द्वेषापोटी महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग चालू आहे. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर रोज खंडणीचे गुन्हे दाखल होत असताना तेव्हा एवढी तत्पर आहेत. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची वेळ पहिलीच आहे. त्याच्यावरून त्यांना अटक करणे योग्य नाही. कोकणात शिव्याशिवाय बोलणं सुरू होत नाही. राणेची बोलायची ती एक स्टाईल असल्याचे म्हणत नारायण राणेंच्या वक्तव्यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोकणात जन आशीर्वाद यात्रा रद्द होणार नाहीच, कारण शिवसेनेला आता भीती वाटू लागली आहे. कोकणात शिवसेनेचे अस्तित्व आता संपुष्टात येईल या भीतीने सरकारकडून ही कारवाई करण्यात येत आहे. ज्याचे सरकार आहे, त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना शांत केले पाहिजे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही अनेकदा भडकावू वक्तव्ये केलेली आहेत. तेव्हा तीही भाषणे काढली जातील.

केवळ आपले सरकार असल्याने एवढ्या तत्परतेने केंद्रीय मंत्र्याच्या अटकेचे आदेश काढण्यात आले. नारायण राणेंना अटक झाल्यास पुढील भूमिका आम्ही स्पष्ट करू. कायदा, सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे आहे. परंतु केवळ सत्तेचा दुरूपयोग करण्याचे काम सरकार कडून केले जात असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Leave a Comment