Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Wednesday, March 12, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक होळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO कडून या महत्त्वाच्या योजनेत बदल; होणार हे फायदे
  • आर्थिक

होळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO कडून या महत्त्वाच्या योजनेत बदल; होणार हे फायदे

By
Kajal Samindar
-
Wednesday, 12 March 2025, 5:32
EPFO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच केंद्र सरकारने (Central Government) खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा (EDLI) योजनेत तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. हे बदल विमा लाभ, सेवा कालावधी आणि मृत्यू लाभांच्या नियमांशी संबंधित आहेत.

1 वर्षाच्या आत मृत्यू झाल्यासही विमा लाभ मिळणार

यापूर्वी जर एखाद्या कर्मचारीने एका वर्षापेक्षा कमी सेवा दिली असताना त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेअंतर्गत कोणताही लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या नियमानुसार, आता अशा परिस्थितीतही कुटुंबाला किमान 50,000 चा विमा लाभ मिळेल. यामुळे दरवर्षी सुमारे 5,000 कुटुंबांना थेट आधार मिळणार आहे.

मृत्यू लाभासाठी नवीन नियम लागू

पूर्वी, जर एखाद्या कर्मचाऱ्याने काही काळ पीएफमध्ये योगदान दिले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला EDLI चा लाभ मिळत नव्हता. मात्र, आता हा नियम बदलण्यात आला आहे. जर कर्मचाऱ्याचा मृत्यू शेवटच्या योगदानाच्या सहा महिन्यांच्या आत झाला आणि तो अद्याप कंपनीच्या नोंदीत असेल, तर त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेचा लाभ मिळेल. या बदलामुळे दरवर्षी सुमारे 14,000 कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

नोकरी बदलल्यासही सेवा कालावधी खंडित होणार नाही

पूर्वी जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलताना काही दिवसांचा ब्रेक घेतला, तर तो सेवा खंडित मानला जात असे, आणि याचा परिणाम विमा लाभावर होत असे. मात्र, नव्या नियमानुसार, दोन नोकऱ्यांमधील अंतर दोन महिन्यांपर्यंत असेल, तर तो कालावधी सततची सेवा म्हणून ग्राह्य धरला जाईल. यामुळे कुटुंबाला EDLI चा विमा लाभ मिळण्यास अडथळा येणार नाही. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 1,000 कुटुंबांना फायदा होईल.

दरम्यान, EDLI योजना 1976 पासून लागू असणार आहे. ती EPF सदस्यांना जीवन विमा संरक्षण प्रदान करते. जर एखादा कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला 7 लाखांपर्यंतचा विमा लाभ मिळू शकतो. ही योजना कुटुंबांसाठी मोठा आधार बनली आहे. आता EPFO च्या या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षेचा आधार मिळणार आहे.

  • TAGS
  • central government
  • EDLI
  • EPFO account
Previous articleपुण्यापासून जवळ असलेली उन्हाळ्यात भेट देण्यासारखी 5 अप्रतिम ठिकाणे
Kajal Samindar
Kajal Samindar
https://hellomaharashtra.in/
मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेत काम. द भोंगा, मुलुखमैदान आदी माध्यमांत कामाचा अनुभव. राजकारण, अर्थकारण आदी विषयांत अधिक रस.

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

upi payments

UPI आणि RuPay व्यवहारांवर पुन्हा शुल्क लावण्याचा सरकारचा विचार; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

government employee

होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ अब्जाधीश

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp