सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही ; मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केली नाराजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना करून सरकार बनवलं असलं तरी अनेक वेळा या आघाडीतील अंतर्गत कुरघोडी समोर आल्या आहेत. दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही अशा शब्दांत पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली खडाजंगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर मंत्र्यांनी घेतलेला आक्षेप, त्याचसोबत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आवाज चढवून बोलत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली त्याचसोबत सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीची जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितले.

बैठकीत मराठा आरक्षणाचा पेच, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे राज्यापुढे उभे ठाकलेले आर्थिक संकट, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना या विषयांवरही चर्चा झाली. तसेच राज्यभर चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणावर देखील चर्चा झाल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment