लॉकडाऊनमुळे तब्बल १२ कोटी लोक झाले बेरोजगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनामुळे ओढवलेल्या लॉकडाउनचा जसा जागितक अर्थव्यस्थेवर परिणाम झाला आहे तसा भारतावर सुद्धा झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरु असलेल्या आतापर्यंतच्या दीर्घकालीन लॉकडाउनने देशातील १२ कोटींहून अधिक कामगारांना देशोधडीला लावले आहे. गेल्या महिनाभरात देशात १२ कोटी २० लाख बेरोजगार झाल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारीची ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.

१२ कोटी २० लाख लोक बेरोजगार होणं हा गेल्या काही वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांकी स्तर आहे. यात मजुरी करणारे आणि दैनंदीन कमाई करणाऱ्या कामगारांना लॉकडाउनची मोठी झळ बसली असल्याचे ‘CMIE’ ने म्हटलं आहे. नोकरी गमावणारे वाढले आहेत. तसेच नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे, असे CMIEच्या अभ्यासातून दिसून आले आहे. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण ३६.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

बेरोजगारी वाढल्याने विरोधकांना आयत कोलीत मिळाल असून केंद्र सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. दरम्यान, असंघटीत क्षेत्रापाठोपाठ आता कॉर्पोरेट आणि स्टार्टअप , छोटे मोठे उद्योग यांनीही नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात बेरोजगारी आणखी वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. लघु आणि मध्यम उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या, वाहन क्षेत्र, एफएमसीजी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील कंपन्यांना मंदीचा जबर फटका बसला आहे.

रोजंदारीवर पोट भरणाऱ्या या लोकांचे हाताचे उत्पन्न गेले
छोटे व्यावसायिक, फेरीवाले, बांधकाम मजूर, हाताने रिक्षा ओढणारे, हमाल अशा दैनंदिन कमाई करणाऱ्या कोट्यवधी श्रमिकांची रोजीरोटी लॉकडाउनमुळे बुडाली असे CMIE ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment