सातारा जिल्ह्यात 379 गावे बाधित; 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता – जिल्हाधिकारी शेखर सिह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता झाले आहे. तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. याबाबत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी महत्वाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. एनडीआरएफ एक टीम कार्यरत आहे.

जिल्हाधिकारी सिह म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झालेली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30, पाटण तालुक्यातील 70, महाबळेश्वर तालुक्यातील 113, सातारा तालुक्यातील 13, जावली तालुक्यातील 102 गावे अशत: बाधित झाली आहेत. तर जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु जिल्ह्यातील एकूण 18 जणांचा मृत्यु झाला असून 24 जण बेपत्ता आहेत तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे.

यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत व्यक्ती, 2 जण बेपत्ता व 20 मृत पशुधन, कराड तालुक्यात 3 हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात 12 मृत व्यक्ती व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत व्यक्ती व 2 मृत पशुधन, सातारा तालुक्यात 2 मृत पशुधन, जावली तालुक्यात 2 मृत व्यक्ती व 2 जण बेपत्ता झाले आहेत.

जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

Leave a Comment