गरिबांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा करा; काँग्रेसची मोदी सरकारला मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम किसान खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी अशी मागणीही काँग्रेसने केंद्र सरकारला केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नैतृत्वात तयार करण्यात आलेल्या काँग्रेसच्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारकडे या सर्व मागण्या केल्या.

काँग्रेस पक्षाच्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसदर्भात ते म्हणाले, लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे, पीक खरेदी आणि स्थलांतराच्या समस्येवर काँग्रेस पक्षाने एक सविस्तर प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन 1 ते 2 दिवसांत मोदी सरकारला सोपवला जाईल. अशी माहिती रमेश यांनी पत्रकारांना दिली. या प्लॅनबाबत आणखी माहिती देताना ते पुढे म्हणाले, ‘सरकारने आतापर्यंत जी पावले उचलली आहेत ती पुरेशी नाहीत. आम्हीही सरकारला सल्ला देणार आहोत. लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही एक ठोस प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन आम्ही लवकरच सरकारला सोपवणार आहोत. या बैठकीत मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही लघू आणि मध्यम उद्योगांना मदत देण्यावर जोर दिला आहे. तसेच काँग्रेस सल्लागार समितीची बैठक दर दुसऱ्या दिवशी होईल, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment