…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने वादाला फोडणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्याने आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी म्हंटल की, मतदार संघाच्या हक्कासाठी, तुमच्या मागण्यांसाठी मंत्री यशोमती ठाकूर या रणरागिणी झाल्याचं आपण पाहिलं आहे. वेळ आली तर त्या तुमच्यासाठी CM च्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत.’ असं विधान नाना पटोले यांनी म्हंटल.

दरम्यान नाना पटोले यांनी सातत्याने आगामी सर्व निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच शक्य झाल्यास प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment