मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली – नाना पटोले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते रायगड येथे बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली आहे, तसेच केंद्र सरकारचा ढिसाळपणा, नियोजन शून्यता, जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या नियमांचं पालन न करणं, यामुळेच देश स्मशानभूमी बनलीय. देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधानांवर जागतिक पातळीवर टीका होत असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. मोदींचं खेला होबे सुरु होतं. देशाला स्मशान केलं आणि आज ते भावुक होत असतील यावर विश्वास बसत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment