केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून विचारलं पाहिजे की…; जेष्ठ काँग्रेस नेत्याने केलं महाराष्ट्राचं समर्थन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त असूनही त्यामानाने लसीचा पुरवठा होत नाही असा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर हर्षवर्धन यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावला. उलट महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले असा आरोप त्यांनी केला. यामध्ये आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांनी उडी घेतली असून महाराष्ट्र सरकारचे समर्थन केले आहे.

यावेळी चिदंबरम ट्विट करत म्हणाले, ‘केंद्र सरकार तथ्यांकडे दुर्लक्ष करत कोरोनाच्या प्रसारावरून महाराष्ट्राला टार्गेट करत आहे. महाराष्ट्रात 80% आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाला आहे. यामध्ये जवळपास वीस राज्य महाराष्ट्राच्या माग आहेत. त्यातबरोबर फ्रन्टलाइन श्रमिकांचे 73% लसीकरण महाराष्ट्रात झाला असून यामध्ये महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे असं आरोग्य मंत्र्यांनीच सांगितले आहे.’

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना एका आरशासमोर उभं करून प्रश्न विचारला पाहिजे की काय केंद्रानं महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा केला आहे का? लसीकरणाच्या मोहिमेत होत असलेल्या गडबडीचं जबाबदार केंद्र सरकार आहे. ज्यामध्ये लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा न होणंदेखील सामील आहे,” असं चिदंबरम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना निशाणा साधला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment