आमच्यापेक्षा अमृता फडणवीसांना ‘वसुली’ची जाणीव अधिक; नाना पटोलेंचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरून टीका केली. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. “अमृता फडणवीस यांना वसुलीची जाणीव अधिक असेल. त्या माझ्या सुने प्रमाणे आहेत,” असे पटोले यांनी म्हंटले आहे.

आज महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र्भर बंदला पुकारण्यात आला होता. त्याला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. मात्र, भाजप भाजपने या बंदला विरोध केला आहे. यावेळी अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.”राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बंदला विरोध केला, तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस अमृता यांनी सुद्धा महाराष्ट्र बंदच्या विरोध केला आहे.

महाराष्ट्र बंदमध्ये रस्त्यावर भाजप उतरले नाही म्हणून त्यांना बंद कळला नसेल. बंद साठी जबरदस्ती झाली असेल त्याचे काँग्रेस समर्थन करत नाही. हा सरकरचा बंद नव्हता हा पक्षीय बंद होता. वसुलीची जाणीव अमृता फडणवीस यांना अधिक असेल. त्यामुळे त्यांनी आज ट्विट करीत आज किती वसुली झाली हे कोणी सांगेल का? अशी विचारणा केली आहे. असो अमृता फडणवीस या माझ्या सुने प्रमाणे आहेत. विरोधक जे आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही. ज्या कोणी जाळपोळ आणि बस ची तोडफोड केली त्याचे आम्ही समर्थन करत नसल्याचे पटोले यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment