सुषमा अंधारे यांनी ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून मागितली माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं, असं वक्तव्य सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केले होते. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते याचा दाखला देत सुषमा अंधारे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या गोष्टीवरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला. यानंतर सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही असे म्हणत वारकरी संप्रदायाची माफी मागितली.

ज्या व्हिडीओवरुन रोष व्यक्त होतोय, तो व्हिडीओ जुना म्हणजेच ठाकरे गटात प्रवेश करण्याआधीचा असल्याचे सुषमा अंधारें (sushma andhare) यांनी सांगितले आहे. अंधारेंच्या त्या व्हिडीओवरुन वारकरी संतापले आहेत. राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवावं. अशा बाईनं टीका करणं योग्य नसल्याचं वारकऱ्यांचे म्हणणे होते. तर वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती.

तर प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुद्धा भाजपचाच स्टंट असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे या ठाकरे गटात आल्यापासून वारंवार शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून सुषमा अंधारे (sushma andhare) या महाप्रबोधन यंत्राच्या माध्यमातून त्या लोकांशी संवाद साधत शिंदे गटावर टीका करत आहेत.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या