‘सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढतोय : प्रकाश आंबेडकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात आहे. वास्तवक पाहता सरकारच्या हलगर्जीपणामुळेच कोरोना वाढत आहे, असा आरोप करीत ’लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

आंबेडकर म्हणाले आहेत कि, राज्यातील नागरिक लॉकडाऊनला विरोध करण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. गेल्या वर्षी जे जम्बो कोविड सेंटर सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनडीओंना चालवायला दिले, अशी घणाघाती टीकाही आंबेडकरांनी राज्य सरकावर केलीय. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक भरडले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल, असं आंबेडकर यांनी म्हटलंय.

Leave a Comment