स्वतःहूनआलेल्यांचीच चाचणी ; हर्सूल एन्ट्री पॉइंटवरील प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मनपा प्रशासनाच्या वतीने बाहेर गावाहून शहरात येणार्‍या नागरिकांची ६ एन्ट्री पॉईंटवर चाचणी केली जात आहे. परंतु या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही न थांबवता जे स्वतः आलेत त्यांचीच चाचणी केली जात असल्याचा प्रकार हर्सूल येथे समोर आला आहे.

शहरात कोरोनाचा कहर वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्याकरिता प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून, बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे.

२० मार्चपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. एकूण ६ ठिकाणी शहरातील प्रवेशद्वारावर चाचणी केली जात आहे. येथे दररोज शेकडो चाचण्या केला जात असल्याचा दावा प्रशासनाने केला. परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

जे लोक स्वतःहून तेथील पथकाकडे येत होते. त्यांचीच कोरोना चाचणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतर असे हजारोच्या संख्येने लोक चारचाकी दुचाकी आदी वाहनाने शहरात तसेच शहराबाहेर ये-जा करत होते परंतु पथकाने कुणालाही थांबवले नाही. यामुळे या एन्ट्री पॉईंट वरील चाचणीबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment