केंद्राचा विमा धारकांना दिलासा, विम्याच्या नूतनीकरणास मुदतवाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायसरमुळे अनेक देशांमधील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारतातील अर्थव्यवस्थेत सुद्धा कोरोनामुळे परिणाम होत आहे. त्याच्या थेट परिणाम देशातील नागरिकांवर होत आहे. यातच केंद्र सरकार नागरिकांना दिलासा देत एक महत्वाची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व विमा धारकांना विमा धारकांना विम्याचे प्रिमियम भरण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ देत दिलासा दिला आहे.

अर्थ मंत्रालयाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये लॉकडाऊनमुळे ज्या विमा धारकांचे आरोग्य आणि मोटार (थर्ड पार्टी) विम्याचे नूतनीकरण झाले नाही. त्यांच्या अडचणी कमी करत सरकारने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, सर्व विमा धारक १५ मे किंवा याआधी रक्कन भरुन आपल्या विम्याचे नूतनीकरण करू शकतात. दरम्यान, देशात कोरोनामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, २० एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाणी एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमध्ये सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment