मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे ‘मास्क’ विनाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते मंत्रालयात उपस्थित झाले होते. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयामध्ये पोहचलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क शिवाय दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते. मात्र या नियमांचे आज राज यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.

मुंबई महानगरपालिकेने मास्क घालणे बंधनकारक केलं असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला १ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं आहे. देशभरातील अनेक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संसर्गजन्य कोरोनावर आळा घालण्यासाठी सार्जजनिक ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहे. असं असतानाही राज्यातील एका प्रमुख पक्षाच्या नेत्यानेच अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन केल्याचे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी मास्क का घातलं नव्हतं याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची माहिती समोर आली आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लागेल. तर सरकारी आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी छोटे दवाखाने सुरु करावे लागतील. तसेच परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन पुन्हा महाराष्ट्रात घ्यावं. तर MPSC विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पोहोचवावं. अनेक विद्यार्थी आज कुठेनाकुठे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयामध्ये पोहचलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क शिवाय दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते. मात्र या नियमांचे आज राज यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेने मास्क घालणे बंधनकारक केलं असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला १ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं आहे. देशभरातील अनेक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संसर्गजन्य कोरोनावर आळा घालण्यासाठी सार्जजनिक ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहे. असं असतानाही राज्यातील एका प्रमुख पक्षाच्या नेत्यानेच अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन केल्याचे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी मास्क का घातलं नव्हतं याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची माहिती समोर आली आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लागेल. तर सरकारी आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी छोटे दवाखाने सुरु करावे लागतील. तसेच परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन पुन्हा महाराष्ट्रात घ्यावं. तर MPSC विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पोहोचवावं. अनेक विद्यार्थी आज कुठेनाकुठे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment