Couple Mansoon Places | पावसाळ्यात पार्टनरसोबत निवांत वेळ घालवायचा असेल तर, महाराष्ट्रातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Couple Mansoon Places | महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि पावसाळा सुरू झाली की, सर्वत्र निसर्ग एकदम हिरवा गार होऊन जातो. आणि सगळ्यांना पावसात फिरायला जायचे वेध लागतात. जर तुम्ही देखील आता तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत पावसाळ्यात फिरायला जायचे प्लॅनिंग करत असाल, तर अनेक लोक हे सगळ्यात आधी महाबळेश्वरला जातात. परंतु महाबळेश्वर व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या अनेक ठिकाण आहे. जिथे पावसाळ्यामध्ये खूप चांगले वातावरण असते. एका कपलसाठी खूप चांगले ठिकाण असते. आता आपण महाराष्ट्रातील अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

महाबळेश्वर (Couple Mansoon Places) हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. अनेक जोडपी ही लग्नानंतर त्याचप्रमाणे पावसाळ्यात देखील महाबळेश्वरला भेट देतात. कारण इथला निसर्ग देखील खूप छान असतो. त्यामुळे तुम्ही महाबळेश्वरला देखील या पावसाळ्यात तुमच्या पार्टनर सोबत जाऊ शकता.

यावर्षी तुम्ही लोणावळा खंडाळामध्ये देखील पावसाळ्याची भेट देऊ शकता. लोणावळा खंडाळ्याला निसर्गाने वेढलेले आहे. या ठिकाणी विविध ठिकाणे देखील आहे. त्याचप्रमाणे या परिसरात अनेक रिसॉर्ट आणि व्हीलादेखील आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत कॉलिटी टाईम स्पेंड करण्यासाठी इथे जाऊ शकता.

माथेरान (Couple Mansoon Places) हे ठिकाण मुंबई आणि पुण्यापासून अत्यंत जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अत्यंत कमी वेळात आणि कमी पैशात देखील जाऊ शकता. या ठिकाणी तुम्ही पर्यटनाचा आनंद देखील होऊ शकता. माथेरानमध्ये अनेक चांगले चांगले पॉईंट्स आहेत.

या पावसाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही सहलीचा प्लॅन करत असाल, तर अलिबाग हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये ही ट्री प्लान करू शकता. या ठिकाणी तुम्हाला विविध गोष्टी देखील पाहायला मिळतील..

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे ठिकाण देखील पावसाळ्यात सहलीच्या दृष्टीने अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी सुंदर असा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी जाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला कोकणातील दृश्य देखील बघायला.

रत्नागिरी हा देखील तुम्हाला पावसातील सहलीसाठी एक चांगला पर्याय आहे. या ठिकाणी शांत असा समुद्र आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीचे सौंदर्य देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच गणपतीपुळे, दापोली, हरिहरेश्वर या ठिकाणी देखील तुम्ही रत्नागिरीमध्ये जाऊन भेट देऊ शकता.