Covid 19: 2 वर्षांत 5 लाख मृत्यू तर 4 कोटींहून अधिक रुग्ण; कोरोना विरुद्धची लढाई संपणार कधी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारताच्या कोविड-19 साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र या विषाणूशी लढण्याचे हे युद्ध कधी संपेल याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या दोन वर्षांत देशाला विविध प्रकारच्या कोरोना व्हायरसचाही सामना करावा लागला आहे. साथीच्या रोगाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, विषाणूच्या डेल्टा व्हेरिएन्टने कहर केला होता, तर ओमिक्रॉन व्हेरिएन्टमुळे संसर्ग खूप वेगाने पसरला.

आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजे 30 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान विद्यापीठात सेमिस्टर परीक्षा देऊन भारतात परतलेल्या विद्यार्थिनीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. तेव्हापासून, भारताला कोविड-19 च्या तीन लाटांचा सामना करावा लागला, ज्या दरम्यान म्युटेशनमुळे विषाणूचे अनेक व्हेरिएन्ट झाले, त्यापैकी काही अत्यंत घातक ठरले.

भारतात आतापर्यंत 4.94 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 4,10,92,522 कोरोना विषाणू संसर्गाची पुष्टी झाली आहे, तर 4,94,091 लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortia (INSACOG) नुसार, गेल्या दोन वर्षात भारतात कोरोना विषाणूचे सात व्हेरिएन्ट आढळून आले आहेत, ही चिंतेची बाब आहे. यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, b.1.617.1 आणि b.1.617.3 तसेच AY सिरीज आणि Omicron व्हेरिएन्टचा समावेश आहे.

यापैकी कोरोना विषाणूचे डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएन्ट घातक मानले गेले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएन्टची लागण झाली आणि यामुळे हजारो लोकं मरण पावले. देशात सध्या ओमीक्रोन या नव्या व्हेरिएन्ट मुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 2 जानेवारीपर्यंत 1.5 लाख नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे, त्यापैकी 71,428 नमुन्यांमध्ये चिंताजनक व्हेरिएन्टआढळून आले आहेत.

भारतातील साथीच्या रोगाचा अंत झाल्याबद्दल संभ्रम कायम आहे

साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी, आरोग्य तज्ञांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा आणि लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचा सल्ला दिला आहे, मात्र भारतात महामारी कधी संपेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल म्हणाल्या, “आम्ही अजूनही साथीच्या आजाराच्या मध्यभागी आहोत. त्यामुळे विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखणे आणि जीव वाचवणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

Leave a Comment