धोक्याची घंटा! दिल्लीत ३१ जुलैपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या साडे पाच लाख होईल- मनिष सिसोदिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राजधानी दिल्लीला पुढच्या काळात कोरोनामुळे भयंकर स्थितीला समोर जावं लागू शकते. दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडे पाच लाख कोरोना रुग्ण होतील, असा गंभीर इशारा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिला आहे. दिल्लीत सामूहिक संसर्ग नाही, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु, दिल्लीत सामूहिक संसर्गला सुरुवात झाली आहे, असं दिल्ली सरकारचं म्हणणं असल्याचं सिसोदिया म्हणाले. त्यामुळं १५ जूनपर्यंत दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या ही ४४ हजारापर्यंत जाऊ शकते. हा आकडा ३० जूनपर्यंत वाढून १ लाखपर्यंत जाऊ शकतो. आणि १५ जुलैपर्यंत दिल्लीत करोनाचे सव्वा लाख रुग्ण असतील. तर ३१ जुलैपर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर जाईल, असंही सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार झाले पाहिजे. पण दिल्ली सरकारचा हा निर्णय नायब राज्यपालांनी रद्द केला. यामुळे दिल्लीकरांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. आम्ही राज्यपाल अनिल बैजल यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह केला. पण त्यांनी नकार दिला, असं सिसोदिया यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे दिल्लीकरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. दिलीत गेल्या २४ तासांत ३७०० जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात १००७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. म्हणजेच एकूण चाचण्यांपैकी २७ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळलेत. गेल्या आठवड्यात हा दर २६ टक्के इतका होता. चाचणी केल्यावर बहुतेक नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यामुळे दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिल्ली सोमवारी कोरोना चाचणीत २७ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही ३० हजारांवरजवळ पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”