गंभीरच्या नजरेत गांगुली आणि धोनी नाही तर हा अनुभवी गोलंदाज आहे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याला राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली पण धोनीच्या नेतृत्वात त्याने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक हे दोन विश्वचषक जिंकले.युवा विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये असताना गंभीरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले होते. गंभीरच्या १३ वर्षाच्या कारकीर्दीकडे पाहता त्याला भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांसह खेळण्याची संधी मिळाली आहे.अशा परिस्थितीत गंभीरला कोणत्याही एका कर्णधाराची निवडणे करणे सोपे नसले तरी या माजी सलामीवीरसाठी सर्वोत्कृष्ट कर्णधाराचे नाव सांगण्यात अजिबात संकोचला नाही.

Gautam Gambhir: World Cup 2011 was won by team effort | Cricket ...

डिसेंबर,२०१८ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रारूपातून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या गंभीरने सर्वोत्तम कर्णधार म्हणून अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेला निवडले आहे.स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टेडवर गंभीर म्हणाला, “हो, महेंद्रसिंग धोनी रेकॉर्ड्सच्या बाबतीत आहे ,पण मला खेळण्याची संधी मिळू शकणारा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणजे अनिल कुंबळे.”

गंभीर म्हणाला की, जर कुंबळेने बर्‍याच काळासाठी भारताचे नेतृत्व केले असते तर त्यांच्या नावावरही अनेक रेकॉर्ड नोंदविण्यात आले असते.गंभीर म्हणाला , सौरव गांगुलीने खरोखर महान कर्णधारपद भूषवले.पण एक कर्णधार ज्याने नक्कीच बर्‍याच काळासाठी भारताचे नेतृत्व पहायला हवे होते ते म्हणजे अनिल कुंबळे. त्याच्या नेतृत्वात मी एकूण ६ कसोटी सामने खेळलो.त्याने फार काळ भारताचे कर्णधारपद सांभाळले नाही. जर त्याने बर्‍याच काळासाठी भारताचे नेतृत्व केले असते तर त्यानेही बरीच रेकॉर्ड मोडली असती. “

In extending birthday wish to Anil Kumble, Gautam Gambhir pays ...

नोव्हेंबर २००७ मध्ये राहुल द्रविडने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुंबळेला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या १७ व्या वर्षी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. त्यावेळी एमएस धोनी भारताच्या एकदिवसीय आणि टी -२० संघाचा कर्णधार होता.

कुंबळेने भारतातर्फे कसोटी (६१९) आणि एकदिवसीय (३३७) दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतले आहे. २००८ मध्ये निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी त्याने १४ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात भारताने तीन कसोटी सामने जिंकले तर ६ गमावले. त्याचवेळी ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. कुंबळेच्या रिटायरमेंटनंतर धोनीला तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले.

गौतम गंभीर ने अनिल कुंबले को बताया ...

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment