८ वर्षानंतर इरफान पठाणने माजी कर्णधार धोनीवर केला ‘हा, गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या स्विंग गोलंदाजीने क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या इरफान पठाणला आपल्या कारकिर्दीचा शेवट असा होईल याची कल्पनाही नव्हती. पठाण २०१२ मध्ये श्रीलंकेविरूद्ध अखेरचा भारतीय संघासाठी खेळताना दिसला होता. या सामन्यात पठाणने चमकदार कामगिरी केली होती तसेच तो सामनावीरही ठरला होता. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात पठाणने पहिले आपल्या संघासाठी २८ चेंडूत २९ धावा केल्या आणि नंतर शानदार गोलंदाजी करत त्याने १० षटकांत ६१ धावा देत ५ विकेट घेतल्या.

मात्र अशी कामगिरी करूनही, भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा कधीही त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी दिली नाही. यावेळी, तो संघात पुनरागमन करण्यासाठी घरगुती क्रिकेट खेळत राहिला आणि संधी मिळत नसतानाही त्याने येथेही आपला ठसा उमटविला. एका युट्यूब वाहिनीशी बोलताना पठाणने आपले हे दुःख मनातून बाहेर काढले आणि त्या वेळचे संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि प्रशिक्षक यांना लक्ष्य केले.

पठाणबरोबर जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा होता. पठाण याने या संभाषणात सांगितले की,’ त्याला संघात नियमितपणे संधी दिली जात नव्हती. त्याशिवाय माझ्याबाबत एक अफवा पसरली होती की, माझ्या गोलंदाजीतील स्विंग आणि वेग संपला. म्हणूनच मला संघात पुन्हा कधी संधी मिळाली नाही.

या संभाषणात पठाण म्हणाला, “जेव्हा मी भारताकडून माझा शेवटचा सामना खेळला, तेव्हा मला सामनावीर म्हणून निवडले गेले. यानंतर, माझ्याकडे सतत दुर्लक्ष केलं गेलं. मी याबद्दल प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला पण काही गोष्टी या प्रशिक्षकाच्या हातात नसल्याचे त्यांनी मला सांगितले.

तो म्हणाला, “मात्र, मी येथेच थांबलो नाही आणि त्यावेळी मी संघाचा कर्णधार धोनीला विचारले की, मला संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का मिळत नाही? माझ्या गोलंदाजीत आणखी काय सुधारले पाहिजे? धोनीनेही त्याला अचूक असे उत्तर दिले नाही. त्यानंतर निवडकर्त्यांनीही मला निवडले नाही.

VIDEO: MS Dhoni, Irfan Pathan having fun in dressing room ...

यावेळी आपला राग दूर करताना पठाण म्हणाला की,’ मी कोठे चूक करीत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तो म्हणाला, “मी वारंवार त्याला एकच गोष्ट विचारू शकत नाही. यामुळे तुमचा आदर कमी होतो. याचा परिणाम असा झाला की मला पुन्हा संघात संधी मिळाली नाही.

या संभाषणात इरफान पठाण म्हणाले की,’ भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर तो घरगुती सय्यद मुश्ताक अली टी -२० करंडक २०१६ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तसेच तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाच्या धावा करणारा फलंदाज देखील ठरला होता, परंतु असे असूनही निवड समितीने म्हटले होते,’ की यामध्ये ती मजा नाहीये.’ दरम्यान, पठाणने आपल्या या संभाषणात माजी सलामीवीर आणि त्यावेळचे निवड समिती अध्यक्ष श्रीकांत यांनाही लक्ष्य केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment