धोनीच्या रागाबद्दल कुलदीपचा मोठा खुलासा, म्हणाला- त्यादिवशी मला खूप भीती वाटली होती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीला हे नाव त्याच्या शांत स्वभावामुळे मिळाले आहे.सामन्यात कोणतीही परिस्थिती असो,धोनी मैदानावर नेहमी शांतच असतो.हेच कारण आहे की केवळ टीम इंडियाच नाही तर जगभरातील क्रिकेटर्स त्याचा खूप आदर करतात.आता कोरोनामुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे,अशातच धोनीच्या रागाबद्दल भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने एक मोठा खुलासा केला आहे.

टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादवने याबाबत सांगितले आहे की गेल्या २० वर्षांत धोनीला कधीही राग आलेला नाही. कुलदीपने यासाठी एका इंस्टाग्राम व्हिडिओ शोमध्ये २०१७ मध्ये श्रीलंकेविरूद्ध इंदूर येथे झालेल्या टी -२० सामन्याचा संदर्भ दिला.स्पिनर म्हणाला, “त्या सामन्यात कुशल परेराने कव्हर्सच्या वरून मला चौकार ठोकला. धोनीभाईने मला आरडाओरड करुन फील्डिंग बदलण्यास सांगितले.मी त्याचे म्हणणे ऐकले नाही आणि पुढच्याच चेंडूवर कुशलने रिव्हर्स स्वीपने चौकार लगावला.” कुलदीप म्हणाला, “आता संतप्त झालेला धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला .. मी वेडा आहे, भारतासाठी ३०० एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि मी येथे समजावतो आहे.”

धोनी के गुस्से को...- India TV

कुलदीप म्हणाला की सामन्यानंतर जेव्हा त्याने धोनीला राग का आला असे विचारले तेव्हा धोनीने नकार दिला आणि सांगितले की मी फक्त ओरडलो आहे जेणेकरून तू चांगली गोलंदाजी करू शकशील.कुलदीप यादव पुढे म्हणाला, ‘धोनीच्या या रागामुळे मी घाबरलो. यानंतर मी माही भाईला विचारले, तुलाही राग येतो का, मग तो म्हणाला – मला २० वर्षांपूर्वी राग आला होता.पण मला आता राग येत नाही मी फक्त ओरडतो. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment