१५ जूननंतर पुन्हा संचारबंदी? जाणुन घ्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यापासून देशात आणि राज्यातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा देशात कडक संचारबंदी जाहीर होईल का अशी भीती नागरिकांमध्ये असतानाच व्हाट्स अप तसेच सोशल मिडीयावर एक मेसेच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये १५ जूननंतर संचारबंदी पुन्हा लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे सत्य नसून अफवा असल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.

या व्हायरल मेसेजमुळे अनेक नागरिक संभ्रमात आहेत तसेच चिंताग्रस्त झाले आहेत. अनेकांनी ट्रेन तसेच विमानाची तिकिटे बुक केली आहेत. पुन्हा संचारबंदी जाहीर होऊन पुन्हा वाहतूक बंद होणार असल्याच्या या मेसेजमुळे हे नागरिक त्रस्त झाले आहेत. ’15 जून के बाद फिर से हो सकता है संपूर्ण लॉकडाउन. गृह मंत्रालय ने दिये संकेत, ट्रेन और हवाई सफर पर लगेगा. ब्रेक कोरोना की बढ़ती रफ्तार के बाद लिया गया फैसला ‘ अशाप्रकारचा हा मेसेज आहे. मात्र हा मेसेच अफवा असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही आहे.

 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबी ने हा मेसेच खोटा असल्याचे सांगितले आहे.  त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी लोकांना अशा खोट्या मेसेजपासून सावध राहन्यासाचे आवाहन ही केले आहे. यावरून १५ जूननंतर पुन्हा संचारबंदी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment