“वेळ येईल तशी पलटी मारतात” म्हणत दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरे वेळ येईल तशी पलटी मारतात हे संपूर्ण देशाला माहीत आहे असा पलटवार त्यांनी केला.

दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हंटल की, माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे ,वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे.माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये. असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले-

झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. आख्ख्या देशाला, महाराष्ट्राला माहिती नाही, इतक्या जवळून उद्धव ठाकरे आपल्या माहिती असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

Leave a Comment