दिल्ली विधानसभा निकाल:‘मन की नव्हे तर जन की बात’ आता देशात चालणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र बर्‍यापैकी स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील लोकांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्याकडे सत्तेची चावी सोपविली आहे. दिल्लीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

”दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन. दिल्लीतील जनतेने ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार हे दाखवून दिलं आहे. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तथाकथित राष्ट्रीवादी विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही”

दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसैनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो,” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment