दिल्लीतील हिंसाचार सोनिया गांधी यांच्या चिथावणीखोर वक्तव्याने- प्रकाश जावडेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप केला. दिल्लीतील घडलेला हिंसाचार हा केवळ २ दिवसांचा नसून गेल्या २ महिन्यांपासून लोकांना भडकवण्याचा प्रयन्त केला जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना सोनिया गांधी यांनी २ महिन्यांपूर्वी रामलीला मैदानात केलेल्या भाषणात आर-पारची भाषा वापरली होती. त्यांच्या या वक्तव्यानेच दिल्लीतील दंगल झाली नसेल असं कशावरुन? असं म्हणत भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी सोनिया यांच्यावर निशाणा साधला आहे.

जावडेकर म्हणाले की, ”गेल्या २ महिन्यांपासून हिंसाचार भडकावण्याचे प्रयत्न सुरू होते, सोनिया गांधी यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत ‘अंतिम लढाई ‘करण्याचे आवाहन केले. तर प्रियंका गांधी कोट्यावधी लोकांना तुरुंगवास भोगावा लागेल, तेव्हा कायर बानू नका असं म्हटलं होत. तसेच राहुल यांनी काँग्रेस तुमच्या सोबत आहे, घाबरू नका! असं म्हटलं होत. काँग्रेस कुटुंबीयांच्या या विधानांमधूनच लोकांची माथी भडकवण्याला सुरवात झाली होती.”

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment